Women's Asia Cup T20 : भारताचा 181 धावा करूनही मलेशियाविरूद्ध 30 धावांनी विजय
India Women vs Malaysia Women : आशिया कप महिला क्रिकेट 2022 मध्ये आजच्या सामन्यात भारताने मलेशियाचा 30 धावांनी पराभव केला. भारताने मलेशियासमोर 182 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मलेशियाने 5.2 षटकात 2 बाद 16 धावा केल्या असतानाच पावसाने सुरूवात केली. त्यानंतर सामन्यात एकाही षटकाचा खेळ झाला नाही. मलेशियाच्या डावाची पाच षटके पूर्ण झाल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 30 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारताकडून मेघनाने सर्वाधिक 69 धावांची तर शेफाली वर्माने 46 तर रिचा घोषने नाबाद 33 धावांची खेळी करत भारताला 181 धावांपर्यंत पोहचवले होते.