वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 33 केव्हीची वीज तार तुटली ; किन्ही येथील घटना

in #yavatmal2 years ago

Screenshot_2022-05-27-12-23-13-63_92460851df6f172a4592fca41cc2d2e6.jpg

यवतमाळ : घरावरून गेलेली 33 केव्हीची वीज तार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तुटली. त्यामुळे लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. यवतमाळ लगतच्या किन्ही येथे ही घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र, लोकांचे आर्थिक नुकसान झाले.कवडू राठोड, गोविंद राठोड आणि बाळू तुरी यांच्या घरावरू लाईन गेली आहे. ही तार तुटून पडू शकते, अशी माहिती वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु, कुणीही याकडे लक्ष दिले नाही. वीज तार तुटून पडताच जमिनीतून लाव्हारस निघत असल्याचा भास झाला होता.अवघ्या काही वेळात अनेक इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेने सरपंच आणि नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाबद्द्ल संताप व्यक्त केला.