प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या अविनाश राठोड याचा गौरव ; महागाव तालुक्यात पुरात बस गेली होती वाहून
यवतमाळ : पावसाळ्यात नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज चालकाला न आल्याने बस वाहून गेली होती. बस मध्ये20 ते25 प्रवाशी असल्याची माहिती मिळताच आपल्या जीवाची पर्वा न करता महागाव तालुक्यातील वाकान येथील युवकाने पुरात धाव घेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून जीव वाचवले. त्याच्या या धाडसाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या गौरवामुळे इतरांना प्रेरणा मिळेल, असे मत अविनाश राठोड याने व्यक्त केले.