बस चालवतानाच ड्रायव्हरला आला अटॅक, सिग्नलवर थांबलेल्या सगळ्यानाच मग…
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना चिरडत बस पुढे जात असल्याचे दिसत आहेत.
जबलपूरः मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये भयंकर अपघात झाला. जबलपूरमध्ये एक मेट्रो बसने रिक्षा, दुचाकी आणि स्कुटी चालवणाऱ्यांना चिरडतच पुढे निघून गेली. या अपघातात बसचा चालक हरदेव पाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर या अपघातात एक ज्येष्ठ नागरिकही गंभीर जखमी झाला होता. त्याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर गंभीर जखमी झालेल्या पाच जणाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.