गहलोतांच्या माफीने निष्ठा आणखी गडद झाली…
अशोक गहलोत यांनी रविवारी जयपूरमध्ये जे राजकीय नाट्य घडले आहे, त्याची त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे.
नवी दिल्लीः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांनी दिल्लीतील 10 जनपथवर आपण काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर जात असल्याचे जाहीर करताच काँग्रेसमधील त्यांचे निष्ठावान नेत्यांमध्ये शांतता पसरली. गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election 2022) लढवणार नसल्याचे जाहीर करत सोनिया गांधींची त्यांनी लेखी माफीही मागितली. त्यामुळे एका अर्थाने राजस्थानातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेले राजकीय संकट तात्पुरते का होईना संपुष्टात आले.