Yati Narsinghanand Giri: संतांची पदयात्रा पोलिसांनी रोखली; नरसिंहानंदांना का केलं नजरकैद? 6 October 2022,

in #digras2 years ago


ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Yati Narsinghanand Giri: संतांची पदयात्रा पोलिसांनी रोखली; नरसिंहानंदांना का केलं नजरकैद?
Published on : 6 October 2022, 10:39 am

By
सकाळ डिजिटल टीम

गाझियाबादः हिंदू समाजाला जागरुक करण्यासाठी गाझियाबाद ते मेरठ अशी संतांची पदयात्रा आयोजित करण्यात आलेली होती. मात्र ही पदयात्रा पोलिसांनी रोखली आहे.

जूना आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरी महाराज यांना पोलिसांनी तीन दिवसांसाठी नजरकैद केलंय. पोलिसांनी आपल्याला जेलमध्ये सडवण्याची धमकी दिल्याचा आरोप महंत यति यांनी केलाय. गाझियाबादचे पोलिस अधीक्षक देहात ईरज राजा आणि एसडीएम विनय कुमार सिंह हे पदयात्रा सुरु होण्यापूर्वीच डासना येथील शिवशक्तीधाम येथे पोहोचले.अधिकाऱ्यांनी कलम 144 लागू असल्याचं सांगून त्यामुळेच नरसिंहानंद गिरी यांना तीन दिवसांसाठी नजरकैद केल्याचं सांगितलं. डासना येथील शिवशक्तीधामचे मठाधिपती आणि श्रीपंचदशनाम जूना आखाड्याचे महामंडलेश्वर यति नरसिंहानंद गिरी महाराज आपल्या 20 शिष्यांना घेऊन पदयात्रेचं नियोजन केलं होतं.

हेही वाचा: Thailand Shooting: लहान मुलांच्या 'नर्सरी'त गोळीबार; 22 चिमुकल्यांसह 34 जणांचा मृत्यू

ही पदयात्रा शिवशक्तीधाम डासना ते मेरठच्या खजुरीपर्यंत आयोजित केली होती. हिंदू समाजाने स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासंबंधी जागृती करण्यात येणार होती. त्यांनी सांगितलं होतं की, आज देशात हिंदू कुटुंबांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे ही संतांची पदयात्रा इतिहास रचणार आहे. शिवाय हिंदुंमध्ये आत्मविश्वास जागृत करणारी आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी आपल्याला साथ द्यावी, असं नरसिंहानंद गिरी यांनी आवाहन केलेलं.