राज्यात तलाठ्यांच्या ४१२२ पदांसाठी होणार भरती; महसूल विभागाने मागवली माहिती

in #digras2 years ago

![]महसूल विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या ४१२२ पदांची भरती लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेली १०१२ आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसुल विभाकडुन सुरु करण्यात आली असुन प्रत्येक विभागीय आयुक्तांकडुन जिल्हानिहाय तपशील सादर करण्यास शासनाने सुचीत केले आहे. महसुल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी एक तलाठी अशी सद्यस्थिती आहे. परिणामी गावातील कामांवर, लोकांना मिळणाऱ्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. तलाठ्यांची रिक्त पदे भरुन नवीन सजे निर्माण करुन त्यांचीही भरती करण्याची मागणी राज्य तलाठी संघाच्यावतीने शासनाकडे अनेकदा करण्यात आली होती)