शेतकऱ्यांना महागाईची झळ बसू दिली नाही - नरेंद्र मोदी
गांधीनगर : कोरोनाचे संकट आणि युक्रेन युद्धामुळे खतांच्या किमती वाढल्या असल्या तरी शेतकऱ्यांना खत टंचाई जाणवू नये आणि त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून केंद्र सरकारने त्याचा पुरवठा कायम राखला. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आम्हाला जे काही करणे शक्य आहे ते आम्ही नक्कीच करू असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.