...तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील : उद्धव ठाकरे

in #yavtmal2 years ago

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक महामंडळाच्या मैदानावर जाहीर सभा सुरू आहे. यावेळी अनेक दिवसांपासून नामांतराच्या मुद्द्यावर उद्दव ठाकरेंनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मी आत्ताही या शहराचे नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदलले आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही दुसऱ्या धर्मांचा द्वेश करत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.