रामदास कदमांची बेईमानी महाराष्ट्र पाहतोय; भास्कर जाधव

in #yavtmal2 years ago

चिपळूण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पहिला दसरा मेळावा झाला. तेव्हा रामदास कदमांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणून भाषण केले होते. तोच दसरा मेळावा आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होऊ नये, असे कदमांनी म्हणणे म्हणजे ते किती कृतघ्न आहेत, ते किती उलट्या काळजाचे आणि बेईमान आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, अशी टीका शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर गुहागर शिवसेनेतर्फे शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला.