काँग्रेस मविआमध्ये राहणार की जाणार? उद्या दिल्लीत फैसला
मुंबई : महाविकास आघडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस पक्ष राहणार की जाणार याबाबत उद्या सोमवारी (ता.३०) दिल्लीत फैसला होणार आहे. काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातली प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवले आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला मिळत असलेली दुय्यम वागणूक, काँग्रेसच्या (Congress Party) विषयाबाबत दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.