विराटच्या वक्तव्याने खळबळ; 'कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा फक्त धोनीने...'

in #yavatmal2 years ago

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक 2022 च्या हंगामात आपली जुनी लय पुन्हा दिसला. कोहलीने स्पर्धेतील तिसरा सामना खेळला आणि सलग दुसरे अर्धशतक झळकावले. भारतीय संघ जिंकू शकला नसला तरी कोहली मात्र आपल्या जुन्या रंगात दिसला आहे. सामना संपल्यानंतर कोहलीने आपली व्यथा मांडली. जेव्हा तो वाईट टप्प्यातून जात होता आणि जेव्हा त्याने टी-20 किंवा कसोटीचे कर्णधारपद सोडले तेव्हाची परिस्थिती त्याने सांगितली.bhushan_esakal___2022_09_05T083201_763.jpg