उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला केंद्राकडून हिरवा कंदिल; ठाणेकरांना मोठं गिफ्ट

in #yavatmal2 years ago

माजी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठवलेल्या एका प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजूरी दिली आहे. ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भुपेंदर यादव यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता.