ठाकरेंना जमिनीवर आणा ; अमित शहा

in #yavatmal2 years ago

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात धोका सहन करणारा कधीच भक्कम होऊ शकत नाही,’’ असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ठाकरे यांना जमिनीवर आणण्याची वेळ आली’ असल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकतानाच शहा यांनी भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. गणेश दर्शनाच्या निमित्ताने अनेकांच्या भेटीगाठी घेत शहा यांनी मुंबई भाजपच्यावतीने जोरदार मोर्चेबांधणी केली.राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला सुरुंग लावल्यानंतर भाजपने आता मुंबई महापालिकेवर नेम धरला WhatsApp_Image_2022_08_29_at_12_25_39_PM.jpeg