IND vs PAK : वर्चस्व कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; आज भारत-पाक सामना
Asia Cup 2022 : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची खरी स्पर्धा आजच्या सामन्यातून सुरू झालेली असली तरी सुपर-४ (अव्वल चार संघ) मधील सर्वात महत्त्वाची लढत अर्थात भारत-पाकिस्तान सामना आज होत आहे. गेल्या रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली. आता हेच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी रोहित शर्माचा संघ सज्ज आहे. त्याच वेळी बाबर आझमचा संघ परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील असेल, मात्र हा सामनाही प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल, यात शंका नसेल.पहिला सामना अटीतटीचा