शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यासंदर्भात विचारलं असता रितेश देशमुख म्हणाला,

in #yavatmal2 years ago

राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडी मागील तीन महिन्यांपासून घडत असतानाच शनिवारी यामध्ये एक नवा अध्याय जोडला गेला. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या ठाकरे गटामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंधेरीतील पोटनिवडणुकीआधी ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवलं आहे. यासंदर्भात आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच नाशिकमधील एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुखला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवण्यात आल्याचा उल्लेख करत विचारलेल्या प्रश्नाला रितेशनेही सविस्तर उत्तर दिलं.नाशिकमध्ये पत्नी जेनेलियासोबत एका कार्यक्रमासाठी हजर असलेल्या रितेशने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, राजकारणात सुद्धा तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे, असं म्हणत एका पत्रकाराने प्रश्न विचारायला सुरुवात केली. तो प्रश्न पूर्ण होण्याआधीच रितेशने, “राजकारणात माझ्यासारख्या तरुणांची गरज आहे?” असा प्रतिप्रश्न विचारला. त्यानंतर लगेचच, “माझ्याच घरातील दोन तरुण आधीच राजकारणात आहेत,” असं उत्तर दिलं तेव्हा त्याच्या बाजूला बसलेली त्याची पत्नीही हसल्याचं पहायला मिळालं.तुम्ही आलात तर बरं होईल. तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे काँग्रेसला,” असं पत्रकारने म्हटलं त्यावर रितेश केवळ हसला. यावरुनच अन्य एका पत्रकारने, राज्यात सध्या जी स्थिती दिसते आहे राजकारणाची ती पाहिल्यावर काय वाटतं असा प्रश्न विचारला. “कालच शिवसेनेसारख्या पक्षाचं चिन्ह रद्द करण्यात आलं आहे. शिवसेना नाव सुद्धा गोठवण्यात आलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? जे काही राजकारण सुरु आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय?” असा थेट प्रश्न रितेशला विचारण्यात आला.Riteish-Deshmukh.jpg