रत्नागिरी : दुरुस्तीची वाट पाहतोय रखडलेला आंबेत पूल

in #yavatmal2 years ago

मंडणगड : म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न गेली चार वर्षे रखडला असून शासनाचे दुर्लक्ष झाल्याने या पुलाचे भविष्य अंधारात आहे. मंडणगड, दापोली तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीत महत्वाची भूमिका राहिलेला हा पूल आजही दुरुस्ती न झाल्याने बंदच ठेवण्यात आला आहे.या प्रश्नासाठी तीन तालुक्यातील नागरिकांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आल्याने मंडणगड दापोली व म्हसाळा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष समितीच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे. राज्यात तीन महिन्यापूर्वी झालेल्या सत्तातरानंतर अस्तित्वात आलेले नवीन शासन तीन तालुक्यातील जिव्हाळ्याच्या प्रश्नावर यंदाचे बांधकाम हंगामात कोणती भूमिका घेते या विषयी प्रचंड उत्सुकता आहे.dfgvjk.jpg