संतापजनक घटना! मुलं की गुरं? 120 विद्यार्थांना ट्रकमध्ये कोंबलं, अनेकजण बेशुद्धावस्थेत

in #yavatmal2 years ago

शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला संस्कार देणारे मंदिर असते. कुटुंबानंतर मुलांवर संस्कार देणाचं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवण्याचं काम शाळा करत असते. अभ्यासाप्रमाणेच कला आणि खेळ यांसारख्या गुणांना आकार देण्याचं काम देखील शाळचं करत असते. पण, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार गोदिंया जिल्ह्यात घडला आहे.

गोंदिया जि्ल्ह्यातील मजितपूरच्या शासकीय आदिवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळासाठी घेऊन जाताना शाळेच्या प्रशासनाने चक्क ट्रकचा वापर केला आहे. एकाच ट्रकमध्ये आदिवासी शाळेच्या तब्बल 120 मुलामुलींना अक्षरश: कोंबून खेळण्यासाठी घेऊन जात होते. शाळेच्या या बेजबाबदारपणामुळे या विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी- विद्यार्थीनींची प्रकृती खालावली आहे. तर, श्वास गुदमरून काही विद्यार्थी- विद्यार्थींनी बेशुद्ध देखील झाले आहेत.