पाचव्यांदा बोहल्यावर चढणार होता ७ मुलांचा बाप; मुलांनी रोखला विवाह, नववधू फरार
उत्तरप्रदेश राज्यातील सीतापूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जगात अशी बरीच माणसं आहेत ती एक नव्हे तर अनेकवेळा विवाहबंधनात अडकताना दिसतात. मात्र, उत्तरप्रदेशमध्ये अजब प्रकार पाहायला मिळालं. मुलानेच ५ व्यांदा लग्न करणाऱ्या बापाचा विवाह मोडला. इतकेच नाही तर नवरदेवाच्या पहिल्या व दुसऱ्या पत्नीच्या मुलांनी वडिलांना पाचव्यांदा लग्न करताना पाहून लग्नमंडपातच राडा केला. मुलांचा गोंधळ पाहून घाबरलेली नववधू लग्नमंडपातून पळून गेली. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
आपकी वोटिंग पावर कम हो गई है अब 3 दिन तक किसी को लाइक मत करें उसके बाद लाइक करिएगा न्यूज़ पोस्ट करते रहिए