चुकीचा सल्ला देणाऱ्यांनीच शिवसेनेचं नुकसान केलं; केसरकरांचं प्रत्युत्तर

in #yavatamal2 years ago

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद आणि टीका टिपण्णी दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे. शिवसेनेकडून आज संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर हल्लाबोल केला होता. त्याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले. पक्ष नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच शिवसेनेचं नुकसान केल्याचं म्हणत दिपक केसरकर यांनी संजय राऊतांवर टीका केली.ते माध्यमांशी बोलत होते. (Deepak Kesarkar repply to Sanjay Raut)२०१९ ला अनेकजण माझ्याकडे येऊन लोटांगण घालत होते. सरकार स्थापन झालं, त्यावेळी तुम्ही का नाही बोललात, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला होता. त्यावर ते म्हणाले की, अनेक गोष्टी राऊतांना महित नसतात. ते स्वत:ला खूप जवळचे समजतात. पण तसं नाही. ते शरद पवारांच्या जवळचे आहेत. ते उद्धव ठाकरेंवर किती प्रेम करतात हे माहित नाही. शिवाय उद्धव ठाकरे यांचं मन वळविण्यासाठी चार ते पाच महिन्यांपूर्वीच प्रयत्न केले होते, असंही केसरकर म्हणाले.

यावेळी केसरकर यांनी खासदार भावना गवळी यांना कार्यकरणीतून काढण्यावर आक्षेप घेत त्यांनी तुमचा झेंडा पाचवेळा उंचावल्याचं म्हटलं. तसेच एकनाथ शिंदे यांना आधी गटनेतेपदावरून काढलं. त्यानंतर तुम्ही नार्वेकरांना पाठवलं. आधी जखम द्यायची आणि नंतर मलम लावण्याचा सल्ला देणाऱ्यांनीच शिवसेनेचं नुकसान केल्याचा टोला केसरकर यांनी राऊत यांना लगावला.

Sort:  

हम सब लोग एक दूसरे की खबरों को लाइक करेंगे कमेंट करेंगे तभी आगे बढ़ेंगे खबरों को लाइक करें कमेंट करें