राणा दाम्पत्याची हायकोर्टात धाव; आज होणार सुनावणी
गेल्या तीन दिवसांपासून हनुमान चालिसा पठणाच्या संदर्भात चर्चेत आलेलं राणा दाम्पत्य सध्या तुरुंगात आहे. दरम्यान या दोघांनीही मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केलं आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी या दाम्पत्याला अटक करण्यात आली होती.
काल म्हणजेच रविवारी वांद्रे न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणातली सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे. दरम्यान नवनीत आणि रवी राणा यांनी आपल्या विरोधात दाखल झालेली एफआय़आर रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आज दुपारी सुनावणी होणार आहे.राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे न्यायालयाच्या सुनावणीनंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला
बेहतरीन न्यूज है आपकी स्नेहा जी।