T20 World Cup साठी टीम इंडिया 6 ऑक्टोबरला होणार रवाना, जाणून घ्या सर्व काही
ताज्या
शहर
गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी
T20 World Cup साठी टीम इंडिया 6 ऑक्टोबरला होणार रवाना, जाणून घ्या सर्व काही
Published on : 1 October 2022, 6:21 am
By
किरण महानवर
T20 World Cup Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली टी-20 मालिका संपल्यानंतर दोन दिवसांनी भारत संघ विश्वचषकापूर्वी तयारी शिबिरात सहभागी होणार आहे. भारत 13 ऑक्टोबरपर्यंत पर्थमध्ये सराव करणार आहे, जिथे ते वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळतील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध आणखी दोन सराव सामने खेळण्यासाठी ब्रिस्बेनला जातील.
स्टँडबायसह टी-20 विश्वचषक संघातील पाच सदस्यांना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नाही. सूर्यकुमार यादव, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, दीपक हुड्डा आणि रवी बिश्नोई असे पाच क्रिकेटर आहेत. त्यामुळे हे सामने त्यांना मेगा स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतील.