राज्यात २०२० मध्ये मृत्यूच्या प्रमाणात १६.५ टक्के वाढ ; नागरी नोंदणी अहवालातील माहिती
मुंबई: राज्यात २०२० मध्ये मृतांच्या संख्येत आधीच्या वर्षांच्या तुलनेत सुमारे १६.५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नागरी नोंदणीच्या अहवालानुसार निदर्शनास आले आहे. देशभरात ही वाढ सुमारे ६.२ टक्के असून बिहारपाठोपाठ महाराष्ट्रात जास्त वाढ झाली आहे.