घरात बसून कुटुंबातील व्यक्तींना अल्टिमेटम द्यायचा असेल तर द्या; अजित पवारांनी उडवली खिल्ली
: राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा गाजत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. 'राज्यात कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. सर्व धार्मिक स्थळांनी भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी. सुप्रीम कोर्टाने आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये,' असं