तीन पक्ष बदलणाऱ्या केसरकरांवर कसा विश्वास ठेवणार; आदित्य ठाकरेंचा सवाल Published on : 5 August 2022, 1:58 pm

in #tiwari2 years ago

esakal_new__76_.jpgमुंबई : एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज अनेक गौप्यस्फोट केले. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपसोबत जाणार होते, असा दावा करण्यात आला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्याविषयीदेखील गौप्यस्फोट केला. केसरकर यांनी केलेल्या गौप्यस्फोटांवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे. (Aditya Thackeray news in Marathi)

हेही वाचा: मुंबई जिंकल्यानंतर BJP कोणाला कुठं सोडून देईल कळणारही नाही; जलील यांचा इशारा

आदित्य ठाकरे म्हणाले की, तीन पक्ष बदलून झाल्यानंतर चौथ्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकांवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो. गौप्यस्फोट करताायत, करू द्या. शिवसंवाद यात्रेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत यांचे कारणं बदलेली आहेत. मुख्य गोष्ट हीच आहे की, कोणालाही यांनी केलेली गद्दारी पटली नसल्याची टीका आदित्य यांनी केली.