प्रदूषणाचे विघ्न!
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्वांच्या लाडक्या गणपतीबाप्पाला वाजतगाजत निरोप देण्यात आला. दोन वर्षांच्या कोरोनाकाळानंतर यंदा प्रथमच निर्बंधमुक्त उत्सव साजरा झाला. ना मूर्तीच्या उंचीवर निर्बंध होते, ना गर्दीच्या नियोजनावर. ना आवाज आणि रोषणाईवर. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच ‘उत्सव बिनधास्त साजरे करा’ असे सांगितल्यावर गावोगावच्या हौशानवशांच्या उत्साहाला उधाण आले नसते, तरच नवल होतं.