मुंबईला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच जण मृत्युमुखी

in #pusad2 years ago

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघातात झाला. या अपघातात पाच जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने येत असलेल्या अर्टिगा कारला बोरघाटात एका वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात अर्टिगाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं दिसत आहे
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
मुंबईच्या दिशेने येत असलेल्या अर्टिगा कारला रात्री बारा वाजताच्या सुमारास अपघात झाला. पिंपरी चिंचवड येथे राहणारे कुटुंब मुंबईला जात होते. यावेळी बोरघाटात ढेकू गावाच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याची माहिती आहे.
मुंबईच्या दिशेने येत असलेल्या अर्टिगा कारला रात्री बारा वाजताच्या सुमारास अपघात झाला. पिंपरी चिंचवड येथे राहणारे कुटुंब मुंबईला जात होते. यावेळी बोरघाटात ढेकू गावाच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याची माहिती आहे.
ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. तर दरवाजा मोडल्याने प्रवासी बाहेर फेकले गेले. pune-mumbai-express-way-ertiga-car-accident--95591465.jpg