Shivsena : "गद्दारी नव्हे धाडस"; रत्नागिरीत भाषणं देणाऱ्या आदित्य ठाकरेंना सामंतांचं प्रत्युत्तर
शिवसेनेतल्या बंडानंतर पक्षात एकनाथ शिंदे समर्थक आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले. यानंतर सातत्याने ठाकरेंकडून शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना गद्दार असं संबोधलं जात होतं. आदित्य ठाकरेंनी या बंडानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शिवसंवाद यात्रा सुरू केली. या यात्रेचा पाचवा टप्पा काल रत्नागिरीत पार पडला. यावेळी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी 'गद्दार'चा गजर केला. त्यावरुन आता उदय सामंतांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे
Plz like my post sir