श्रीगणेश उपासनेतून मेंदूचे रक्षण !
जय देवा गजानना, आता व्हा प्रसन्न’ असे सर्वांनी मिळून साकडे घालण्याची सध्या गरज आहे. निसर्गात कुठे दुष्काळ, कुठे महापूर, कुठे आगीचे तांडव, कुठे भूस्खलन हे एका बाजूने चालू आहे, तर समाजात भ्रष्टाचार, स्वार्थीवृत्ती, सत्तेची लोलुपता दिवसेंदिवस वाढते आहे. परिवारात वाद-विवाद, चढाओढ, माझे-तुझे याला मर्यादा राहिलेली नाही. आणि व्यक्तिगत पातळीवरही असमाधान, नैराश्य, एकटेपणा यांच्याशी झुंज द्यावी लागते आहे. वाढती रोगराई, रोज नव्या रूपात येणारे जंतुसंक्रमण हे तर जणू सवयीचे झाले आहे.