देव जे जे दाखवेल ते बघायला तयार आहे, असं का म्हणतेय प्राजक्ता माळी?
मुंबई : परदेशात फिरायला मिळावं, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. सर्वसामान्यांप्रमाणे अगदी कलाकारांचीही असते. बाॅलिवूड कलाकार जितके परदेशात जाऊन शूटिंग करतात, तितकी संधी पूर्वी मराठी कलाकारांना मिळत नव्हती. अगदी एखाद्या मराठी सिनेमाचं शूटिंग परदेशात झालं, तर ते भारी वाटायचं. आता मात्र बदल झालाय.
हल्ली अनेक मराठी सिनेमांची शूटिंग भारताबाहेर व्हायला लागली आहेत. त्यामुळे कामानिमित्त मराठी कलाकारांची परदेशवारी व्हायला लागली आहे. बरेच मराठी कलाकार हे मध्यमवर्गातून पुढे आलेत. त्यामुळे आजही त्यांना परदेशात फिरण्याचं अप्रूप वाटतंच.
Sir plz like my posts
Big fan of yours