महाराष्ट्राला विश्वासात न घेता आलमट्टीची उंची वाढविणार नाही; बसवराज बोम्मई
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा विचार सुरू असला, तरी तो केंद्राच्या अखत्यारीतील विषय आहे. महाराष्ट्र सरकारला विश्वासात घेतल्याशिवाय आलमट्टी धरणाची उंची वाढवली जाणार नाही, असे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले. येथे कणेरी मठावर झालेल्या संत मेळाव्यासाठी ते आले होते. तेथून परत जाताना विमानतळावर त्यांना संघटनेने निवेदन दिले. ‘‘आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने घेतला आहे. धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भाग कायमस्वरूपी पाण्याखाली जाईल. त्यामुळे आलमट्टीची उंची वाढवण्याचा निर्णय