CMची घोषणा कागदावरच; नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून माघारी परतण्याची वेळ

in #nagpur2 years ago

जुने नाशिक : सामान्य जनतेची दिवाळी गोड होण्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून एक लिटर तेल, एक किलो रवा, साखर आणि चणाडाळ अशा चार वस्तू केवळ शंभर रुपयात देण्याची घोषणा केली होती. दिवाळी अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरीदेखील अद्याप स्वस्त धान्य दुकानात या चार वस्तूंचे पॅकेट उपलब्ध झाले नाही. नागरिकांना दुकानात जाऊन माघारी फिरण्याची वेळ येत आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा केवळ कागदावरच होती का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. (CM eknath shinde announcement of free Diwali festival ration remaining on paper Nashik Latest Marathi News)