नागपूर : नागपुरात (Nagpur) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा (IND vs AUS T20) सामना सुरु आहे.
नागपूर : नागपुरात (Nagpur) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा (IND vs AUS T20) सामना सुरु आहे. यावेळी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात संघानं दोन गडी गमावले. विशेष म्हणजे या दोन्ही विकेट अक्षर पटेलच्या षटकात गेल्या. पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीनं कॅमेरून ग्रीनचा झेल सोडला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर भरपाई करताना ग्रीन धावबाद झाला. ग्रीन चार चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलनं ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केलं. मॅक्सवेलला खातेही उघडता आलं नाही. ऑस्ट्रेलियानं आठ षटकात नव्वद धावा करून भारताला 91 धावांचं टार्गेट दिलंय.