…तर त्यांनी ‘हे’ देखील जनतेला सांगावे; रामदास कदमांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज
शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरूच आहे. रामदास कदम यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई : शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये (Shiv Sena) आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरूच आहे. शिवसेनेकडून खोके सरकार आणि गद्दार म्हणत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून देखील शिवसेनेच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते फक्त खोके आणि गद्दार म्हणतात. पण खोके आणि गद्दार म्हणण्यापलीकडे त्यांनी गेल्या अडीच वर्षात जनतेसाठी काय केलं? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. अडीच वर्षात जनतेसाठी काय कामं केलं हे आदित्य ठाकरेंनी एकदा सांगावे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.