IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत सामन्यावर संकटाचे ढग, टॉसला विलंब

in #nagpur2 years ago


IND vs AUS T20 : आज नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) दुसरा टी-20 सामना होतोय. पण, या सामन्यावर पावसाचं सावट आहे. दरम्यान, टॉसला विलंब होत असल्याचं समोर आलंय.
नागपूर : पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind Vs Aus) टीम इंडिया नागपुरात (Nagpur) आमनेसामने आहेत. दुसरा टी-20 (t20) सामना नागपुरात खेळवला जातोय. एकीकडे या सामन्यावर पावसाचं सावट असून नाणेफेकला यामुळे उशिर झालाय. टीम इंडियानं जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागलाय. 208 धावा करूनही टीम इंडियाच्या हाती मागच्या सामन्यात पराभव आला. पण, आता विजयी होण्याचा उद्देश घेऊन टीम इंडियात मैदानात उतरेल.