यदुवंश पेटला..सर्व यादव एकाच मंचावर..नितीश यांच्या मनात नेमकं चालंल तरी काय..

in #nagpur2 years ago


नितीश कुमार बिहार सोडून आता दिल्लीकडे रवाना होत आहेत. त्यामुळे भाजपचे खरे विरोधक हे नितीशी कुमारच असतील असंही आता बोललं जात आहे.
नवी दिल्लीः विरोधकांची मोट बांधण्यासाठी नितीश कुमारांनी (Nitish Kumar) दिल्ली वारीत अनेक दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. विरोधकांच्या विश्वासावरच बिहारच्या राजकारणात आता नितीश कुमार आणखी एक मोठा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत. लालू प्रसाद यादवांचा (Lalu Prasad Yadav) आरजेडी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूचे विलिनीकरणाची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. बिहारच्या या सगळ्या राजकारणात नितीश कुमार प्रमुखाच्या भूमिकेत असणार आहेत. बिहारमध्ये तेजस्वी यादवांकडे राज्याची सूत्र देण्याचीही तयारी झाली आहे.