IND vs BAN: विराट कोहलीने अम्पायरकडे संताप व्यक्त करताच शाकिब अल हसन आला धावत अन्…; पाहा व्हिडीओ
भारतीय क्रिकेट संघाचा फंलदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून टी-२० वर्ल्डकपमध्ये तिसरं अर्धशतक झळकावलं. विराट कोहलीने नाबाद ६४ धावा केल्या असून चार चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. विराट कोहलीने संयमी खेळी करत के एल राहुलसोबत ६७ धावांची भागीदारीही केली. दरम्यान विराट मैदानात एका क्षणी वातावरण तापलं होतं. विराटने नो बॉल का दिला नाही अशी विचारणा अम्पायरकडे केली. यानंतर शाकिब अल हसन विराटकडे धावत आला होता.
नेमकं काय झालं?