त्या दोघांचा एक आवडता शब्द झाला आहे,

in #mumbai2 years ago

राज्यात महिन्याभरापूर्वी झालेल्या राजकीय भूकंपामध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. जवळपास महिन्याभरानंतर सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. मात्र, अद्याप या मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रीमंडळ विस्तार आणि नंतर खातेवाटपाला उशीर होत असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.