रजोनिवृत्ती आणि आहार

in #mumbai2 years ago

डॉ. सारिका सातव

स्त्रियांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक म्हणजे रजोनिवृत्ती. दर महिन्याला येणारी मासिक पाळी हळूहळू बंद होत जाणे म्हणजे रजोनिवृत्ती. अनेक हॉर्मोन्सच्या एकत्रित कार्यामधून मासिक पाळी येत असते. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर त्याच्याशी निगडित असलेल्या हॉर्मोन्सची पातळी ही अर्थातच सामान्य राहात नाही. हाडांची दुखणी, वजन वाढणे, केस व त्वचेमधील बदल, मानसिक अस्थैर्य, हॉट फ्लशेस इत्यादी अनेक लक्षणे या काळात दिसू लागतात. त्यातून जर जीवनशैली आणि आहारशैली चुकली, तर ही सर्व लक्षणे अधिकच बळावतात व बऱ्याच आजारांना आमंत्रण मिळते. याउलट जर योग्य आहारविहार घेतला तर ही सर्व लक्षणे कमी तीव्रतेने जाणवतात. आहार शैलीमध्ये कसा बदल करावा ते आपण सविस्तर पाहू.