शिवसेना-मनसे युतीसंदर्भात शर्मिला ठाकरेंच्या विधानावर सेनेची प्रतिक्रिया; म्हटले..
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यावर शिवसेनेचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर शिवसेना आणि मनसे म्हणजेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी एकत्र यावं असा सूर कार्यकर्त्यांमधून येताना दिसतोय. त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी सूचक विधान केलंय. त्यावर शिवसेनेनं प्रतिक्रियाही दिली आहे.