दिल्लीच्या विजयाने प्लेऑफचे समीकरण बदलले; ३ जागा आणि ८ संघ स्पर्धेत

in #mumbai2 years ago

स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली असली तरी प्लेऑफमध्ये एकच संघाने स्थान निश्चित केले आहे आणि ३ जागांसाठी एक दोन नव्हे तर ८ संघ स्पर्धेत आहेत. गुणतक्त्यात ९व्या क्रमांकावर असलेला चेन्नईचा संघ देखील प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. दिल्लीविरुद्धच्या पराभवाने राजस्थान रॉयल्सचे टेन्शन वाढले आहे. गेल्या ४ सामन्यातील हा त्यांचा तिसरा पराभव ठरलाय.

IPL २०२२चा ताजा गुणतक्ता पाहा

दिल्लीला अजून दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्हीत विजय मिळवल्यास आणि नेट रनरेट चांगले ठेवल्यास दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. राजस्थानचे १२ सामन्यात १४ गुण आहेत. त्यांनी देखील शिल्लक दोन लढतीत विजय मिळवल्यास प्लेऑफचे तिकिट मिळू शकले. जर दोन्ही संघांनी उर्वरीत २ सामन्यात फक्त एक विजय मिळवला तर त्यांना अन्य संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागले.