मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा नीलम गोऱ्हे कडाडल्या खोडसाळपणाचा घेतला खरपूस समाचार

in #mumbai2 years ago

अहमदनगर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद (Border Dispute) अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (Karnataka CM) बेताल वक्तव्यांची मालिकाच सुरु केल्याने उभ्या महाराष्ट्रात संताप व्यक्त केल्या जात आहे. राज्य सरकारसह विरोधकांनीही कर्नाटक सरकारला धारेवर धरले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी संताप व्यक्त करत कर्नाटक मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.