भारतासाठी ही
भारतासाठी ही कसोटी मालिका सर्वात महत्वाची असणार आहे. कारण ही मालिका भारताने मोठ्या फरकाने जिंकली तर त्यांना विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान मिळवता येणार आहे. पण त्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला ३-० किंवा ३-१ च्या फरकाने पराभूत करावे लागेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संघात नसतानाही चार खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे.