काळजी घ्या, राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार, औरंगाबाद, ओझर गारठलं!

in #maharastra2 years ago

राज्यात औरंगाबादचा पारा घसरला आहे. औरंगाबादमधील तापमान 9.2 अंशावर आले आहे. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई, 21 नोव्हेंबर : मागच्या चार महिन्यांपासून पावसाने थैमान घातल्यानंतर काही अंशी वातावरणात गारवा येत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका काहीसा वाढला आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात 15 अंशांच्या खाली नोंद झाली आहे.राज्यात औरंगाबादचा पारा घसरला आहे. औरंगाबादमधील तापमान 9.2 अंशावर आले आहे. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात थंडीची लाट नागरिक शेकोट्यांचा आधार घेतायेत.image-2022-11-21T093710.012.webp