ऑक्टोबरमध्ये सुरू होणार परतीच्या पावसाचा प्रवास ; पंजाबराव डख

मित्रांनो पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजानुसार, 15 ते 17 सप्टेंबर राज्यात मुसळधार पाऊस (Monsoon) कोसळणार आहे. पंजाबराव यांच्या मते या कालावधीत राज्यात राजधानी मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, तसेच अहमदनगर, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा, जालना, छत्रपती संभाजी महाराज नगर, परभणी, हिंगोली, इगतपुरी, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon News) कोसळणार आहे.
त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची तसेच आपली काळजी घेण्याचे आव्हान या वेळी पंजाबराव यांनी केले आहे. मात्र 17 तारखेनंतर राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. मित्रांनो 17 ते 20 तारखेपर्यंत राज्यात पाऊस पडेल मात्र पावसाचा जोर कमी राहणार आहे.या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मात्र 20 तारखे नंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. 21 ते 24 सप्टेंबर राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा एकदा पाऊस होणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आपल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजात पंजाबराव डख यांनी परतीच्या पावसाचा प्रवास केव्हा सुरू होईल याबाबत मोठे विधान केले आहे. पंजाबरावं यांच्या मते या वर्षी परतीच्या पावसाची सुरुवात ऑक्टोबर महिन्याच्या 7 तारखेपासून होणार आहे. मित्रांनो खरे पाहता परतीचा पाऊस हा सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजे जवळपास 17 सप्टेंबर पासून सुरू होत असतो मात्र पंजाबरावांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी परतीच्या पावसाला सुरुवात ही ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

याशिवाय ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. यावर्षी दिवाळीत मराठवाडा आणि विदर्भ या विभागात मोठ्या पावसाची शक्यता आहे. तसेच पंजाबराव यांच्या मते या दरम्यान पूर्वेकडून पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात कोसळणार असल्याने याचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे.
तसेच पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 28 ऑक्टोंबर पासून या वर्षी राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे. निश्चितचं पंजाबराव यांनी या वर्षीचा संपूर्ण मान्सून अंदाज आता सार्वजनिक केला आहे. दरम्यान पंजाबराव यांनी सांगितले की हवामानात अचानक बदल झाल्यास ते शेतकरी बांधवांना निश्‍चीतच सूचित करणार आहेत.
images (17).jpeg