लोक विचारतात तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून

in #india2 years ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘तुमच्याकडे एवढी संपत्ती कोठून आली?’ या लोकांच्या प्रश्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर थेट उत्तर दिलं. “आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही रोज भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. लोक कधीकधी म्हणतात एवढी संपत्ती कोठून आली. अरे लहानपणापासून आम्ही मेहनत केली आहे,” असं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (१३ ऑक्टोबर) त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते. या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, “मी आणि माझा भाऊ आम्ही लहान होतो. त्यावेळी भाजीपाला आणायला पहाटे तीन वाजता बाजारात जायचो. तिथे जाऊन थोडी भाजी द्या हो म्हणत भाजीपाला गोळा करायचो आणि ती भाजी माजगावच्या घरासमोरील फुटपाथवर विकायचो. भाजी बाजार लांब असायचा. त्यावेळी टांगे असायचे. या टांग्यांना मागे धरायला जागा असायची. आम्ही गुपचूप जाऊन टांग्याच्या मागे लटकायचो. काही खोडसाळ लोक टांगेवाल्याला सांगायचे आणि टांगेवाला चाबूक मारायचा. तेव्हा आम्ही दोघेही कळवळायचो.”

Chhagan-Bhujbal-Sharad-Pawar.jpg