राज्यात ७८ हजार पदांसाठी ‘मेगाभरती’ होणार; विविध शासकीय विभागांना रिक्त पदांचा अहवाल मागविला
: गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील राजकीय अस्थिरतेचा परिणाम प्रशासकीय विभागांच्या (Government Department) कामकाजावर झाला होता. रखडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, शासकीय फाईलींचा ढीग यासोबतच शासकीय नोकरीसाठी दिवसरात्र परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न इत्यादी बाबी यामध्ये समाविष्ट होत्या. परंतु येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात नोकरी भरतीचा तिढा सुटणार आहे, नुकतीच काल गृह विभागाची (State Home Department) यासंदर्भात बैठक झाली असून याअंतर्गत गृह विभागाच्या ७ हजार २३१ पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
एकनाथ शिंदेंचं ‘मिशन BMC’; मुंबईसाठी ‘या’ नव्या शिलेदारांची निवड