मनसेला सोबत घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होणार – रामदास आठवले

in #ganpati2 years ago

केंद्रीयमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. तसेच, सध्या मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा नेत्यांची गाठीभेटी वाढल्याचेही दिसत आहे, यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत रामदास आठवले यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. एवढंच नाहीतर मनसेला बरोबर घेतलं तर भाजपाला देशपातळीवर नुकसान होईल. रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात आवश्यकता नाही. असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.Aathwale-and-raj.jpg