फडणवीसांच्या सांगण्यावरुन रवी राणांची टीका”, बच्चू कडूंचा गंभीर आरोप, कुजबूज कॅमेऱ्यात

in #dipak2 years ago

![217c389e-ae1f-4108-a183-e2dc91748816.jpg](मागील काही दिवसांपासून राज्यात आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात ‘खोक्यां’वरून वाद रंगला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये मध्यस्थी केली होती. त्यानंतरही रवी राणांनी ‘घरा घुसून मारेन’ चे वक्तव्य केलं होतं. पण, आता बच्चू कडू यांनी मवाळ भूमिका घेत ‘हा वाद पेटवायचा नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील २० हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, अशा प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी बच्चू कडू मुंबईत आले होते. त्याआधी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पण, पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी बच्चू कडू यांची सहकाऱ्याबरोबर सुरु असलेली कुजबूज कॅमेरात कैद झाली आहे. यात, रवी राणांच्या वक्तव्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.)