CM Eknath Shinde : "खड्डेमुक्तीचं काम आमच्याकडून व्हायचं होतं म्हणून आत्तापर्यंत राहिलं"
मुंबईसह राज्यभरातल्या विविध भागांमधले खड्डे आता जनतेच्या डोक्याचा ताप झाला आहे. राज्यभरातली जनता खड्ड्यांमुळे त्रस्त आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना नवी आशा दाखवली आहे. मार्चपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होणार, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं आहे.